नांदी म्हणजे सुरुवात . नाट्य मंदिरात जेव्हा नाट्य प्रयोग सुरू होतात तेव्हा घंटा वाजते व गणेश स्मरण करून नाटकाला सुरुवात होते . याला नांदी वाजणे म्हणतात. ऋणानुबंध संस्थेची नांदी सुद्धा गणपती मंदिरात च वाजली होती .सन २०११ मध्ये वारजे माळवाडीतील गणपती मंदिरात कलशारोहण सोहळ्याची तयारी सुरू होती. मदतीसाठी अनेक कार्यकर्ते पुढे येत होते, आणि बघता बघता १५-२० जणांची एक सशक्त टीम तयार झाली. सर्वांनी तन-मनाने मदत केली आणि पावशा गणपतीचा कलशारोहण सोहळा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडला.चांगली टीम तयार झाल्यामुळे मंदिरात नवीन-नवीन उत्सव सुरू करण्याचे विचार मनात आले. दोन महिन्यांनी चैत्र महिना आला, आणि मंदिरात वसंत उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला. उत्सवासाठी आमच्या टीमने छोट्याशा वर्गणीतून मदत केली आणि ती मंदिराला दिली. वसंतोत्सव अतिशय सुंदर रीतीने पार पडला आणि आमची टीम अधिक बळकट व कार्यान्वित झाली.वसंतोत्सवाचे दुसरे वर्ष आले. ह्यावेळी आम्ही कार्यकर्त्यांनी प्रत्येकी १००० रुपये जमा केले, ज्यामुळे साधारण १६ हजार रुपयांची वर्गणी जमा झाली. परंतु, ह्या वेळेस वसंतोत्सवाचा सर्व खर्च मंदिराने उचलला, त्यामुळे आमची वर्गणी माझ्याकडेच राहिली. रामनवमीचा उत्सव झाला, आणि त्या निमित्ताने आमच्या मित्र-परिवारातील एक जण माझ्याकडे आले आणि पैशांची थोडी गरज असल्याचे सांगितले. मी त्यांना सांगितले, “हो, करू मदत!” एक कार्यकर्त्याला विचारले, त्यांनी सांगितले, “देऊन टाका ५००० रुपये.” त्यामुळे मी त्या गृहस्थांना ५००० रुपये दिले.दोन-तीन महिन्यांनी त्यांनी ५००० रुपये परत आणून दिले. हीच घटना आमच्यासाठी एक प्रेरणा ठरली आणि ह्याच घटनेतून ऋणानुबंध संस्थेची स्थापना करण्याची नांदी झाली.
Related Post
समर्थ विचार
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।। ह्या सूत्रात समर्थांनी दोन संदेश दिले आहेत.एक चळवळ व दुसरे भगवंताचे अधिष्ठान .थम आपण भगवंतांचे अि धष्ठान म्हणजे काय हे पाहू.भगवंताच्या अधिष्ठानाचा विचार करता, समर्थांच्या तत्त्वज्ञानाचा मागोवा घेणे आवश्यक आहे.श्री समर्थ अद्वैतवादी होते. त्यांच्या मते, मूळ परमात्म्याची दोन रूपे आहेत. एक निर्गुण […]
ऋणानुबंध संस्थेची स्थापना आणि पहिला उपक्रम: पाणी वाटप ३जुलै २०१२ मध्ये स्थापन झालेली ‘ऋणानुबंध’ संस्था, तिच्या सुरुवातीच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करत होती. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्हाला ३ सप्टेंबर २०१२ उजाडले. हा दिवस संकष्टी चतुर्थीचा होता आणि त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता ; तरीसुद्धा या पावसात आम्ही संस्थेचे नोंदणी पत्र आणले आणि ते […]
समाजाच्या भविष्याचा आधार ऋणानुबंध संस्थेने शिक्षण क्षेत्रात मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला. सन २०१३ ते २०१५ ह्या काळात १८ विद्यार्थ्यांना एकूण रुपये ८३१३० रु मदत केली परंतु, काही वेळानंतर असे जाणवले की अनेक जण फक्त मदत मिळते म्हणून येतात, ज्यात गरजू आणि गरीब विद्यार्थी कमी आणि मदत मिळवण्याची इच्छा असलेले जास्त आहेत. […]