एकल पालकत्वाची कारणे
सर्व समाजा मध्ये एकल पालकत्व ही सामान्य बाब आहे. एकल पालकांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा त्याच्या मुलांवर विशिष्ट परिणाम होतो. ऋणानुबंध संस्थेसाठी, पुण्यातील गरीब लोकांच्या जीवनात सुधारणा घडवण्याच्या उद्देशाने, एकल पालकांना मदत करणे आणि त्यांचे जीवन सुलभ करणे हे महत्त्वाचे आहे. या ब्लॉगमध्ये आपण एकल पालकांचे विविध प्रकार आणि त्यांचे विश्लेषण पाहणार आहोत.
एकल पालकत्वाची कारणे एकल पालकत्व विविध कारणांमुळे उद्भवते. काही नैसर्गिक तर काही सामाजिक-साांस्कृतिक आहेत.
खालील कारणे एकल पालकत्वाचे प्रमुख घटक आहेत:
जोडीदाराचा मृत्यू : दोन पैकीं एका पालकांचा मृत्यू हे एकल पालकत्वाचे नैसर्गिक कारण आहे, ज्याचा परिणाम दुदैवी असतो. मृत्यू सारख्या नैसर्गिक आपत्तीत अडकणे हे कोणाच्याही नियंत्रणा बाहेरचे आहे. अशा परिस्थितीत, एकल पालकांना मुलांचे संगोपन करणे अत्यंत आव्हानात्मक ठरते.
घटस्फोट : भारतीय संस्कृतीत घटस्फोटाची कल्पना पूर्वी दुर्लक्षित होती. मात्र, आधुनिक काळात घटस्फोटाचे प्रमाण अतिशय वाढले आहे. याचे कारण, सध्या स्पर्धात्मक जीवनशैली आणि कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्यामुळे स्त्रियांना महत्त्व आणि जबाबदाऱ्या अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे पती पत्नी यांच्या मध्ये तयार होणारे गैरसमज,संशय , मोठ्या अपेक्षा, स्वातंत्र्य ,स्वतःचा इगो या मुळे विवाहामध्ये तणाव निर्माण होतो आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढते.
इच्छे विरुद्ध विवाह : भारत अजूनही जाती धर्म या मध्ये गुरफटलेला आहे . त्यामुळे भारतात प्रेम विवाह सहजासहजी स्वीकारले जात नाहीत अशा परिस्थितीत अनेक वेळा पालक मुलांचे इच्छेच्या विरुद्ध व आपल्या पसंतीच्या मुलामुलाशी विवाह लावून देतात . परंतु या बळजबरीच्या विवाहामुळे त्यांना मुले होतात परंतु पती पत्नी संसारात रमत नाहीत त्या मुळे वाद विवाद सुरू राहून ते साथीदाराला सोडून जातात त्या मुळे सुद्धा अनेकदा एकल पालकत्व उद्भवते.
विवाहबाह्य संबंध : विवाहबाह्य संबंध हे एकल पालकत्वाचे आणखी एक कारण आहे. पर व्यक्ती संबंधी उत्कठा उद्भवल्यास चालू विवाहा तून निर्माण होणारे संबंध तणाव निर्माण करतात. पत्नी किंवा पतीची फसवणूक आणि विवाहबाह्य संबंधांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो. यामुळे विवाह मोडतो आणि एकल पालकत्व येते.
नवजात पालक : अविवाहित असताना आई होणे.ह्याला कुमारी माता देखील म्हणतात .प्रेम मैत्री आकर्षण हे नक्की काय आहे हे समजल्यामुळे तसेच लग्नाच्या खोट्या वाचनातून १८ वया पेक्षा लहान तरुणी शारीरिक संबंध ठेवतात अशा वेळेस योग्य ते प्रोटेक्शन न वापरल्याने व गर्भपात वेळी वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास कुमारी माता होण्याची श्यकता असते. बराच वेळा जोडीदार जबाबदारी झटकतो , पळून जातो किंवा तो सुद्धा अज्ञान असतो बराच वेळास भीतीपोटी किंवा बदनामी पोटी जोडीदाराचे नाव जाहीर करता येत नाही किंवा कायद्या मुळे विवाह करता येत नाही अशा वेळेस एकेरी पालकत्व येते
परित्यक्त पालक : घरातील भांडणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पती किंवा पत्नीने सोडून गेल्यानंतर मुलाला एकेरी पालकत्व येते. यामध्ये अनपेक्षित आव्हाने येतात आणि मुलांसाठी सुरक्षितता आणि स्थिरता राखणे कठीण होऊ शकते.
कौटुंबिक वातावरण : हे एकल पालकत्वाचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. जर घरातील वातावरण तणावपूर्ण असेल, तर मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, एकल पालकांना मुलांचा संगोपन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
एकेरी पालकत्व अनेक आव्हाने आणि ताणतणावांनी भरलेले असते. ऋणानुबंध संस्था या पालकांना विविध प्रकारच्या मदती द्वारे समर्थ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. एकेरी पालकांसाठी आर्थिक, भावनिक, शैक्षणिक आणि सामाजिक सहाय्याची आवश्यकता आहे. अशा प्रयत्नांमुळे एकेरी पालक आणि त्यांच्या मुलांचे जीवन सुलभ होईल आणि त्यांना एक चांगले भविष्य मिळेल.