समर्थ विचार

सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।।

ह्या सूत्रात समर्थांनी दोन संदेश दिले आहेत.
एक चळवळ व दुसरे भगवंताचे अधिष्ठान .
थम आपण भगवंतांचे अ‍ि धष्ठान म्हणजे काय हे पाहू.
भगवंताच्या अधिष्ठानाचा विचार करता, समर्थांच्या तत्त्वज्ञानाचा मागोवा घेणे आवश्यक आहे.
श्री समर्थ अद्वैतवादी होते. त्यांच्या मते, मूळ परमात्म्याची दोन रूपे आहेत. एक निर्गुण दुसरे सगुण.
निर्गुण रूप सद्रुप आहे ते आहे एवढेच आपण सांगू शकतो. सगुण रूप हे सर्व शक्तीचे, सर्व मूल्यांचे व सर्व सद्गुणांचे मूलधार आहे.
म्हणून ते अनादि, अनंत सर्वशक्तिमान, सर्वगुण संपन्न व संपूर्ण आहे. साधुसंतांना त्याचा ‘सत्चिदानंदा’च्या रूपाने अनुभव येतो.
म्हणून भगवंताचे रूप ‘सत्चिदानंद’ आहे असे म्हणतात. ह्याच सत्चिदानंदाची उपासना करण्याकरता ज्ञान,
भक्ती आणि कर्म ह्यांची सांगड घालावी असे श्रीसमर्थ म्हणतात. ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्यांच्या सामर्थ्याचा ‍आविष्कार म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान.
त्याकरता भगवंताची आराधना आवश्यक आहे.

Related Post

पालकत्व: आई आणि वडीलांच्या भूमिका, कर्तव्ये आणि मर्यादा

पालकत्व: आई आणि वडील यांच्या भूमिका, कर्तव्ये आणि मर्यादा पालकत्व म्हणजे मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा पालनपोषणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा होय. यात आई आणि वडील दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ज्या प्रमाणे एखाद्या झाडाला पाणी व सूर्यप्रकाश आवश्यक असतो, अगदी त्या प्रमाणेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आई आणि वडील दोघांचीही गरज असते. आईचे स्त्रीत्व आणि वडिलांचे पुरुषत्व […]

नांदी/ स्टार्ट ,सुरुवात

नांदी म्हणजे सुरुवात . नाट्य मंदिरात जेव्हा नाट्य प्रयोग सुरू होतात तेव्हा घंटा वाजते व गणेश स्मरण करून नाटकाला सुरुवात होते . याला नांदी वाजणे म्हणतात. ऋणानुबंध संस्थेची नांदी सुद्धा गणपती मंदिरात च वाजली होती .सन २०११ मध्ये वारजे माळवाडीतील गणपती मंदिरात कलशारोहण सोहळ्याची तयारी सुरू होती. मदतीसाठी अनेक कार्यकर्ते पुढे येत होते, आणि बघता […]

जागतिक कन्या दिन: मुलींना सन्मान आणि समान संधी देण्याचा संकल्प

काल, 22 सप्टेंबर 2024 रोजी, संपूर्ण जगभरात जागतिक कन्या दिन साजरा करण्यात आला. हा दिवस जगातील मुलींना सन्मान, समान हक्क आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जागतिक कन्या दिन आपल्याला मुलींच्या महत्वाकांक्षांना ओळखून, त्यांना योग्य संधी देण्याचा आणि त्यांच्या भविष्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्याचा संदेश देतो. भारतीय समाजात मुलींनी विविध क्षेत्रात […]