आज गुरू पौर्णिमा आहे. याच विशेष दिवशी, १२ वर्षांपूर्वी, म्हणजेच ३ जुलै २०१२ रोजी, वारजे माळवाडी येथील पावशा गणपती मंदिरात ऋणानुबंध संस्थेची स्थापना करण्यात आली. या पवित्र स्थळी गणेशाच्या कृपेने आणि आशीर्वादाने आम्हाला संस्थेची संकल्पना सुचली. या दिवशी गुरुंच्या चरणी नतमस्तक होताना, आम्ही आमच्या संस्थेच्या प्रवासाचा आणि यशाचा विचार करतो. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी कार्य करत आलो आहोत. गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने, आम्ही आमच्या सर्व गुरुजनांचे, सहकाऱ्यांचे आणि शुभचिंतकांचे मन:पूर्वक आभार मानतो, ज्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आम्ही या प्रवासात पुढे जात आहोत.
Related Post
नांदी/ स्टार्ट ,सुरुवात
नांदी म्हणजे सुरुवात . नाट्य मंदिरात जेव्हा नाट्य प्रयोग सुरू होतात तेव्हा घंटा वाजते व गणेश स्मरण करून नाटकाला सुरुवात होते . याला नांदी वाजणे म्हणतात. ऋणानुबंध संस्थेची नांदी सुद्धा गणपती मंदिरात च वाजली होती .सन २०११ मध्ये वारजे माळवाडीतील गणपती मंदिरात कलशारोहण सोहळ्याची तयारी सुरू होती. मदतीसाठी अनेक कार्यकर्ते पुढे येत होते, आणि बघता […]
मागील लेखात आपण पाहिल की अनाथ विद्यार्थ्यांसारख्याच एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना सुद्धा आपल्या मदतीची, पाठिंब्याची गरज आहे .ह्या एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचे विविध मार्ग आहेत . Runanubandh Social Organization (RSO) यासाठी पुढील उपाययोजना करन्याचा प्रयत्न करीत आहे. शैक्षणिक सहाय्य RSO एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून […]
पालकत्व: एक सुंदर प्रवास
पालकत्व पालकत्व हा आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय अनुभव आहे. हे एक अद्वितीय आणि आव्हानात्मक काम आहे ज्यामध्ये बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आणि सामाजिक विकासासाठी पालकांनी एक महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. पालकत्व ही एक प्रक्रिया आहे आणि पालक असण्याची एक जबाबदारी आहे. यात मुलाचे संरक्षण, पोषण, आणि विकासासाठी मार्गदर्शन करणे समाविष्ट आहे. पालकत्वात मुलांच्या शारीरिक, […]